जनाची नाही तरी मनाची तर ठेवा!
-फहीम खान एकेकाळी समाजात आपले विचार मांडण्यासाठी चौक, बाजारपेठ, सभागृह किंवा कार्यालये हीच प्रमुख व्यासपीठे होती. आजच्या डिजिटल युगात ही जागा सोशल मीडियाने घेतली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, एक्स आणि इतर माध्यमांमुळे प्रत्येकाला स्वतःचे मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने सकारात्मक असली, तरी प्रसिद्धीच्या हव्यासाने या स्वातंत्र्याचा गैरवापरही वाढताना दिसत आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी अक्षरशः स्पर्धा लागली आहे. अधिक व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जात आहेत. विनोदाच्या नावाखाली व्यक्ती, समाज, धर्म किंवा महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. काही क्षणांच्या प्रसिद्धीसाठी संवेदनशीलता, सभ्यता आणि सामाजिक जबाबदारी यांचा बळी दिला जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा गोष्टींना काहीजण मनोरंजनाचे स्वरूप देतात. अलीकडेच गुरगावमधील एका तरुणाची घटना याच वास्तवाची जाणीव करून देते. स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या एका कार्यक्रमात 23 वर्षीय हिमांशु जांग्राने एका मुलीबाबत केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. काह...